"दमकोंडावाही बचाओ संघर्ष समिती व सुरजागड पट्टी पारंपपारीक गोटूल समिती तर्फे मौजा तोड़गट्टा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे बेमुद्दत ठीय्या आंदोलन सुरु आहे.
सदर आंदोलन 11 मार्च पासून सुरु करण्यात आले असून आंदोलन सुरु होऊन आज 137 दिवस झाले आहेत. या आन्दोलनाला भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समिती, वेन्हारा पट्टी पारंपारिक गोटूल समिती, तोड़सा पट्टी पारंपारीक गोटूल समिती व रोपी बरसा इत्यादी इलाकयांनी समर्थन दिले आहे. तसेच छत्तीसगढ़मधील मूलनिवासी बचाओ मंचने सुद्धा समर्थन दिले आहे. या ऐतिहासिक आंदोलनाला आजपर्यंत देशभरातील अनेक संस्था व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले आहे. दिनांक 11 जून 2023 रोजी क्षेत्राचे आमदार धर्मराव आत्राम आंदोलन स्थली येऊन "आपण जीवंत असेपर्यंत लोएड्स एंड मेटल इंजीनियरिंग कंपनी व्यतिरिक्त अन्य एकही खदान होऊ देणार नाही" असे बोलून गेले. 2019 मधील निवडणुकीत आत्राम साहेबांनी असेच "मी निवडून आल्यास सूरजागड पहाड़ीवरील एकही दगड बाहेर जाऊ देणार नाही" असे जनतेला आश्वासन दिले होते. परंतू गेल्या दोन वर्षापासून त्याच सुरजागढ़ पहाड़ीवर खाणकाम त्यांच्या सोयीस्करपणे सुरु आहे. त्यामुळे धर्मराव आत्राम साहेब जे बोलतात त्यात किती सत्यता आहे? किंवा लोकांनी त्याचा किती गांभिर्याने विचार करायचा? हे जनतेला पडलेला प्रश्न आजही कायम आहे.
देशातील व राज्यातील राजकीय पक्ष येथील जल, जंगल, जमीन व नैसर्गिक संसाधन लूटून घेऊन जाणाऱ्या खदान कंपनीच्या पक्षात आहेत. या देशातील आदिवासींची व अन्य परंपरागत वन निवासींची अस्तित्व, अस्मिता व आत्मसन्मान धोक्यात आली आहे. आदिवासी व इतर पारंपारिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा, 2006, पेसा कायदा, 1996, जैवविविधता कायदा, 2004, भारतीय संविधानातील पांचवी अनुसूसूची व ख़ुद भारतीय संविधानाचे उलंघन होत आहे. भारतीय वन संरक्षण अधिनियमात बदल करून दलाल, पूंजीपती, भंडवालशाही यांना येथील नैसर्गिक खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी सोयीस्कर मार्ग तयार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत येथील स्थानिक आदिवासी व अन्य परंपरागत वन निवासी एक हाती संविधानिक लढ़ा देत आहेत. लोक आपापल्या गावातून-घरातून शीधा पाणी घेऊन आंदोलन स्थली येत आहेत. प्रत्येक गावासाठी एक चूल मांडून स्वयंपाक करत आहेत.
आंदोलन स्थली दिवसातून दोन वेळा बैठक होत आहे. पहिल्यांदाच या आंदोलनात विद्यार्थीही मोठ्या संख्याने उपस्थित होते. सध्या शाळा-महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थी महाविद्यालयात परत गेले आहेत. आंदोलनकर्त्यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी ताड़पट्टीच्या झोपडया बनविले आहेत. तोड़गट्टा येथे सुरु असलेल्या आन्दोलनातील कार्यकर्त्याच्या वतीने मौजा तोड़गट्टा येथे सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे व आन्दोलनाला जाहीर समर्थन देऊन मदत करण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे."
Adv. Lalsu Nogoti
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box